सहजच

मनातलं शब्दात

” बस, तुम कभी रुकना मत!”

आज आजी उदास आहेत. हे आजोबांच्या लक्षात आल .काय झालं ग??? आजोबांनी विचारल . आजी म्हणाल्या अहो, आता थकवा येतो .आधी सारखं राहिलं नाही. आता गडबड ,तडतड सहन होत नाही. कुठे जायचं म्हंटल तर जास्त चालवत नाही. आॕटो मधे चढताना त्रास होतो . कधी भाजीत मीठ टाकायला विसरते तर कधी जास्त पडतं. कशाकरिता हे एवढं आयुष्य देवाने दिलं आहे. माहित नाही .
आजोबा म्हणाले, देवाचा हिशोब मला माहित नाही.आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. त्याच्या planning मधे एक क्षणाचाही बदल करणे. आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातात काय आहे?? त्याचा विचार करावा.अग ,वयानुसार हे सर्व होणारच. आधीचे दिवस आठव ना किती काम करायची. पूर्ण घर तू खूप छान सांभाळले. मला कशाची काळजी नव्हतीच कधी . आता वयामाना प्रमाणे हे सर्व होणारच पण त्यातुनच मार्ग काढायचा असतो .आलेला दिवस आनंदात काढणे आपल्या हातात आहे. जीवनाच्या प्रत्येक फेज मधे थोडे शारिरीक बदल होतातच .थोडे आपल्या ला करायचे असतात. आपली ‘ lifestyle’reorganize करायची ,म्हणजे ,आयुष्याची घडी, परिस्थिती प्रमाणे बदलायची असते .कळलं का ?
आजोबा पूढे म्हणाले
‌ चल, आज सायंकाळी बाहेर जाऊ या आपण. छान ती नारंगी साडी नेस. बाहेरच जेवू . आजोबा संध्याकाळी आजींना घेऊन बाहेर पडले. व जवळच असलेल्या बसस्टाॕप वर जाऊन बसले. दोघे बराच वेळ तेथेच गप्पा मारत बसले . आजोबा आजी ना म्हणाले अगं, पाय दुखत असतील तर, मांडी घालून बस छान . . नंतर , ‘गणेश भेळ ‘खाऊनच घरी परतले. अगदी वयाला व तब्येतीला शोभेसे outing आज होते दोघांचे . आजींची उदासी मात्र कुठे पळाली?? हे त्यांना कळलेच नाही . अगदी ‘refresh’ झाल्या . आज आजोबांनी आजीसाहेब साठी on line ‘Mobile stand ‘ मागवला. मोबाईल पकडून आजींचा खांदा दुखतो ना म्हणून .
आज आजींनी तर आजोबांना सकाळीच सांगुन टाकलं ,की मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही .काही तरी चमचमीत खायला घेऊन या . आजोबांनी आनंदाने समोसे ,ढोकळा , खरवस, दोन पुरण पोळ्या आणून आजींची इच्छा पूर्ण केली .ते बघून आजी म्हणाल्याचं अहो, एवढं आणलंत ?? अग आज आणि उद्या मिळुन संपेल की . आज आजीं आजोबांची पार्टी छान झाली.
कोणी तरी खरंच खूप छान म्हंटलं आहे

” खुशीयां बहुत सस्ती है इस दुनिया में ,
हम ही ढुंढतें फिरते हैं ,उसे मेहंगी दुकानों में”।”
आजोबा बऱ्याच वेळा पासुन एका बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ते पाहून अजय म्हणाला , द्या आजोबा मी उघडून देतो. तेंव्हा आजोबा म्हणाले अरे ,नको मी उघडतो. आता आम्हाला प्रत्येक कामात वेळ लागतोच . हे natural आहे . पण काही हरकत नाही. जो पर्यंत करू शकतो तोपर्यंत काम करायचे. हे मी ठरवलं आहे. रोज फिरायला जाणे, भाजी आणणे, dusting करणे, भाजी चिरणे , washing machine मधे धुतलेले कपडे वाळत घालणे‌, कपड्यांच्या घड्या घालणे ,अशी बरीच कामांची जबाबदारी मी घेतली आहे. तुझ्या आजीला पण मदत होते. व माझा वेळ जातो . Something new and different .I am enjoying it . And I feel good .

एका advertisement मध्ये म्हंटले आहे
” बस ,तुम कभी रुकना मत “
अक्षय कुमार ने म्हंटलेले हे वाक्य मला खूप आवडलं.
एक छोटंसं वाक्य. मोजक्या शब्दात .
पण किती अर्थपूर्ण .जेवढ्यांदा वाचावे, तेवढाच त्याचा अर्थ परत दर परत उघडत जातो .एक छोटासा उपदेश जीवनाला वेगळ्याच दिशेने वाटचाल करायची स्फुर्ती देतो.. विचारांत परिवर्तन आणतं.
तो म्हणतो
कधीही थांबू नका, चालत रहा.
म्हणजेच ‘active’ रहा. ‘मनाने आणि शरीराने .’
वाहतं पाणी बघताना , एक वेगळीच उर्जा निर्माण होते .’ धारा ‘ म्हणजे पुढे पुढे जाणारी, वाहणारी .तेच जमलेलं पाणी म्हणजे अनेक रोगांचा ऊगम. म्हणून पाण्याला जमू देत नाही आपण. जमलेल्या पाण्यात डास,किडे पडतात. शेवाळे तयार होते.पाण्याला वास येतो डेंग्यू पसरतो.
आयुष्याचे पण तसेच आहे. शक्य तेवढ active राहणे ही प्रत्येकाचीच आवश्यकता असते .जसं जमेल ,जे जमेल, जे आवडेल ,जे झेपेल, ते करत रहाणे गरजेचे आहे.
” चलती का नाम ही तो जिंदगी है “।
आपल्या पिढीने तरूणपणी एकमेकांचे हात हातात घेतले नाही /नसतील .पण वयाच्या या टप्प्यावर, एकमेकांचा हात प्रेमाने, काळजीने, विश्वासाने , हातात घेणे ही काळाची गरज आहे .

 " कुछ लोग हमेशा खुश और संतुष्ट रहते हे!
  इसलिए नहीं की उनके जीवन में  सबकुछ ठीक होता  है!
  बल्कि इसलिए की उनकी सोच हर हाल में सकारात्मक होती है"!!!

 "ना  थके  कभी  पैर
ना कभी हिम्मत हारी है।
जज्बा  है परिवर्तन का जिंदगी में,
 इसलिये सफर जारी  है।

“प्रत्येक दिवस उत्सव म्हणून साजरा करा.”
“बस , तुम कभी रुकना मत

समाजमाध्यमावरुन साभार

Leave a Reply