क्षुल्लक वादातून ३ तरुणांनी मिळून केली एकाची हत्या

नागपूर : ९ जानेवारी – रस्त्याने जात असताना दुचाकीचा धक्का लागल्याने झालेल्या वादात ३ तरुणांनी मिळून एकाची हत्या केल्याची घटना नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.या प्रकरणी एका विधी संघर्ष बालकासह दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र चोपडे असं मृत तरुणाचे नाव आहे. जितेंद्र चोपडे हा आपल्या मित्रांसोबत त्रिमूर्ती धाब्यावर रात्री जेवण करायला गेला होता. जेवण करून घरी परत येत असताना जितेंद्र हा गाडी चालवत होता, तर त्याचे दोन मित्र पाठीमागे बसले होते. घरी येत असतांना चंद्रकिरण नगर गल्ल मध्ये आरोपी विजय उगरेजा व रवी उगरेजा यांच्या गाडीला जितेंद्रच्या गाडीचा धक्का लागला. यावरून दोन्ही गटात वाद झाला.
आरोपी विजय उगरेजाने गाडीच्या किचनला असलेला चाकू काढून जितेंद्रच्या छातीवर वार केले. वाद सोडवायला धावलेल्या मित्रांवर देखील विजयने हल्ला चढवला. या हल्ल्यात जितेंद्र गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेत एका विधी संघर्ष बालकासह दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले.
पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की, या घटनेमध्ये एकूण पाच आरोपी आहे. घटनेच्या सुरूवातीला आरोपी विजय उगरेजा हा एकटाच होता मात्र त्यांनी फोन करून आपल्या साथीदारांना तेथ बोलावून घेतले. सुरुवातीला वाद शाब्दिक होता, नंतर शाब्दिक वाद हाणामारीमध्ये वाढला. विजयच्या दुचाकीला चेन होती, त्याला एक छोटासा चाकू लागलेला होता, त्याच्या अगोदर शस्त्र म्हणून वापर करत विजयने जितेंद्र, सौरभ व प्रकाश या तिन्ही मित्रावर हल्ला चढवला. या हल्ल्यात जितेंद्रच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या दोन मित्रांनी वाद सोडून त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र विजय व त्याच्या साथीदारानने दोन मित्रावर देखील हल्ला चढवला.
गुन्ह्यात पोलिसांनी तीनच आरोपीला सहभागी असल्याचे दाखवले, दोन आरोपीला पोलीस वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मृतकच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे काही काळ हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत होते. या घटनेत इतर आरोपी सहभागी आहे का याचा शोध आता हुडकेश्वर पोलीस करत आहे.

Leave a Reply