सत्य परेशान हो सकता है पराजीत नही – अनिल देशमुख

मुंबई : ११ मे – मला मिडीयाच्या माध्यमातुन अशी माहिती मिळत आहे की, ईडीकडुन आता माझी चौकशी होणार आहे. मी न केलेल्या गुन्हयाची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतुपोटी सुरु आहे. मी गृहमंत्री असतांना मध्यला काळात काही महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार नाराज असून शकते आणि त्यामुळे माझी चौकशी सिबीआय व ईडीच्या माध्यमातुन होत आहे. पण एक आहे “सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही” असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
पुढे बोलतांना अनिल देशमुख म्हणाले की, मी जेव्हा गृहमंत्री होतो तेव्हा अनेक योग्य निर्णय मी घेतले. यात प्रामुख्याने सिबीआयची स्थापना झाल्यापासुन महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरचा तपास करायचा असेल तर राज्य सराकारच्या परवागीची गरज नव्हती. परंतु ऑक्टोबर २०२० ला गृहविभागाने निर्णय घेतला की, सिबीआयला जर महाराष्ट्रात तपास करायचा असले तर राज्य सरकारची परवानगी घेने बंधनकारक केले. महाराष्ट्राने हा निर्णय घेतल्या नंतर देशातील अनेक राज्याने महाराष्ट्र सरकार प्रमाणेच निर्णय घेतला असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.
त्यानंतर दादरा नगर हवेलीचे सात वेळा खासदार असलेले मोहन डेलकर यांनी मुंबई येथे येवून आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा योग्य तपास होण्याची मागणी अनेक आमदारांनी अधिवेशानात केली होती. त्यावरुन मी एसआयटी गठीत करुन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करुन योग्य तपास सुरु केला. या सर्व गोष्टीमुळे केंद्र सरकार माझ्यावर नाराज असु शकते. त्यामुळेच सिबीआय आणि ईडीच्या मार्फत माझी चौकशी सुरु आहे. ज्या पध्दतीने मी सिबीआयला चौकशीसाठी सहकार्य केले त्याच पध्दतीने ईडीला सुध्दा सहकार्य करणार असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply