सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

सृष्टी उत्पन्न करण्याची क्षमता आणि जबाबदारी संपूर्णपणे “भगवान ब्रम्हाची” त्यात ढवळाढवळ करण्याची कोणालाही परवानगी नाही.
अशी ढवळाढवळ क रण्याचा एक प्रयत्न झाला प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा, तो विश्वामित्र ऋषीं कडून, पण तो फसला. आणि आजतागायत असेकोणी ही त्यांच्या कामात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला नाही.
ब्रम्हदेवाने ठरवून दिलेल्या प्रत्येक प्राण्याच्या कक्षा – आजतागायत त्याच्यात बदल नाही. कोंबडीला पंख, चोच आणि कोंबड्याला तुर्राच् राहणार.
पण आमचे मविआ चे शिवसेनेचे विश्वासघातकी संपादक, पक्षनिष्ठेचा बाप्तिस्मा पलटीमार, मान्यवर संजय राऊत, ह्यांना दिव्यात्कार झाला. (मोठी माणसं म्हणून मोठा शब्द)
की कोंबडी ला जर फक्त लवंग, विलायची, मुसळी खाऊ घातली तर कोंबडीचं अंड हे शाकाहारी होतं. आणि अर्थातच जे शुद्ध शाकाहारी लोकं आहेत त्यांना सूद्धा हे अंड चालू शकतं.
त्याचप्रमाणे नंदुरबार येथे त्यांना कोंबडी खायला दिली ती आयुर्वेदिक कोंबडी होती.
काय मंडळी वाचायला मजा येते आहे नं!!!!!!!!!
हा झाला ! काका झाले, ह्यांना कसे ही करून ब्राह्मण लोकांच्या पुजा आणि कर्मकांड ह्याच्यात ढवळाढवळ करून ह्या सर्व पद्धती बंद करून, ब्राह्मणांना नामोहरम करण्याचे प्रयत्न खुप जुने. अगदी इंग्रजांच्या काळापासून ते आजतागायत सुरू आहे.
त्या ब्राम्हण द्वेषापोटी महात्मा गांधी च्या मृत्यू चे वेळी असंख्य ब्राम्हणांचा बळी घेण्यात आला. जमीन कुळकायदा – कसेल त्याची जमिन – ह्या कायद्यानुसार असंख्य ब्राम्हणांच्या जमिनी हिरावून घेण्यात आल्या, मागासवर्गीय लोकांना नावे बदलण्याची मुभा देवुन मुद्दाम ब्राह्मण लोकांचे आडनाव ठेवण्याची मुभा देण्यात आली, जेणेकरून ख-या ब्राम्हणांच्या मुली तोंडघशी पडुन – एखाद्या मागासवर्गीय मुलाशी लग्न झाल्यास, तिची ब्राम्हण तत्वांची नाळ तुटेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे स्वतः चे मत होते की जर मागासवर्गीय परिवार संपन्न करायचा असेल तर बीज चांगलं पाहिजे. बीज चांगले पाहिजे म्हणजे काय?
तर लग्न होवून घरी येणारी स्त्री ही ब्राह्मण मुली सारखी सुसंस्कृत आणा. आणि त्यामुळे तुमचा परिवार पण संपन्न होईल.
स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी देखील ब्राह्मण आहे.
म्हणजे स्वतः चे घर सुधरवायला ब्राह्मण वर्गाचा वापर करा. ह्या असुयेपोटी ब्राह्मण आहे दोन टक्के पण त्याला आरक्षण नाही. आणि स्वाभिमानी ब्राह्मण आरक्षणाची कुबडी घेवून जीवन जगत नाही.
तर ब्राम्हण पुजा- रितीरिवाज- अनुष्ठाने तोडण्याचे तंत्र फार पूर्वीपासून चालत आलेले आहे. अगदी मुंबईत लॉकडाऊन चे काळात एका जागी फक्त चिकन-मटन ची दुकानं उघडायला परवानगी दिली मात्र भाज्यांची दुकानं उघडायला हायकोर्टाकडून परवानगी घ्यावी लागली. लॉकडाऊन मध्ये मंदिरं बंद हे सुद्धा त्याचेच द्योतक आहे.
तर अशा ह्या ब्राह्मण द्वेष्ट्या विचारसरणी ने संपादक संजय राऊत ह्यांचे डोक्यात किडा वळवळला आणि तोंडातून “आयुर्वेदिक कोंबडी – व्हेजीटेरीयन अंडा” ही संकल्पना राज्यसभेत त्यांनी आपली गरळ ओकली.
आता आयुर्वेदिक कोंबडी म्हणजे काय त्या कोंबडीला काय दोन-चार फांद्या उगवणार पानांच्या? पिसांचे जागी पानं उगवणार? तंगडीच्या जागी काय फांद्या लागणार, तुर्र्याच्या जागी काय फुले लागणार? आणि ह्या फांदींना मग शाकाहारी अंडी लागणार आणि मग काय ती ब्राह्मण लोकांनां जबरदस्तीने खायला लावणार?
ब्रम्हदेवाच्या कामात ढवळाढवळ करू नका सं-जयचंद. हा निसर्ग आहे. शिवसेनेचा पक्ष नाही. की माहौल बदलला आणि सत्तेसाठी तत्व गहाण टाकली.
कोंबडी हाडामासांची म्हणजे हाडामासांचीच् राहणार. ती आयुर्वेदिक कशी होणार? अरे येडं शेंबडं दुसरीतलं पोराला कळतं पण तुम्हाला कळुन वळत नाही? तोच् तुमच्या डोक्यातला वळवळ्या ब्राह्मण द्वेष्टा किडा.
तुम्ही किंवा आंतरराष्ट्रीय समुदायाने समावेश केला म्हणून “अंडं” शाकाहारी होवू शकत नाही.
ब्राम्हणांवर किती ही अत्याचार केले कायदे बदलले तरीही कायद्याच्या चौकटीत राहून, सुसंस्कृत पद्धतीने आणि स्वतः च्या धाटणीचे जीवन जगण्याची कला ब्राह्मण वर्गाकडे आहे.भारतात प्राधान्य मिळाले नाही म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशात ब्राह्मण वर्गाने आपला ठसा उमटवला आहे.
किती ही संस्कृती संपवण्यासाठी तुम्ही धडपड केली तरी ब्राह्मण वर्ग आणि इतर सर्व समाज ही भगवंताची देणगी आहे त्यात ढवळाढवळ करू नका.
तुमच्यामध्ये एवढाच वळवळता किडा असेल तर मुसलमानांच्या उत्सव पद्धती बदलवुन बघा – जिथे इद च्या दिवशी बक-यांना बळी दिले जाते. पण तिथे मात्र तोंड बंद.
ब्राह्मण समाजाची अवहेलना करण्याचा प्रयत्न करु नका त्यांच्या पुजा पद्धती – पद्धतशीर चालू द्या.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करीत, तुमच्या पक्षाची स्थापना झाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी मार्गदर्शनाखाली, त्या तत्वाचे नेसु सोडून, डोक्याला बांधुन वायफळ नसीहत देवू नका.
लक्षात असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज , बाळ शिवा पासून छत्रपती शिवाजी महाराज झाले, ते समर्थ रामदास स्वामी ब्राह्मण आहेत.

भाई देवघरे

Leave a Reply