मग तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागणार काय? प्रवीण दरेकरांचा नवाब मालिकांना सवाल

मुंबई : २ मे – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असले तरी त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याच पहायला मिळत आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्योरोपाच्या फैरी झाडू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर अमित शहा यांनी राजीनामा देण्याचं वक्तव्य केल्यावर आता प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं, राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीसंदर्भात अमित शहा यांनी तेथील अपयशासाठी राजीनामा देण्याची मागणी केली. मला वाटतं त्यांना यशाची व्याख्याच माहिती नाही. ३ वरुन आज ८० जागांवर पोहोचलो आहे.
देशातील पाच राज्यांत निवडणुका असताना आसाम, पुदुच्चेरीत भाजपचा विजय झाला आहे. बेळगाव, पंढरपुरात भाजपचा विजय झाला आहे. देशभरात भाजपला जनाधार असल्याचं चित्र आहे तरीही देशातील एका राज्यात सत्ता आली नाही म्हणून राजीनामा मागणाऱ्या नवाब मलिक यांना मला सांगायचं आहे की, पंढरपूर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी सरकारने एकत्रित ताकदीने लढून सुद्धा पराभूत झाले आहेत मग तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणार का? असा प्रश्न नवाब मलिक यांना मला विचारायचा आहे.

Leave a Reply